मुंबई, (प्रतिनिधी)- कोरोना मुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या १ पहिलीच्या वर्गा पासून पुढचे वर्गाची शाळा सुरु होण्याबाबत संकेत मिळाले असून लवकरच शाळा सुरु होणे अपेक्षित आहे.
राज्यातील ग्रामीण भागांसह शहरांतील १ली पासूनच्या सर्व शाळा येत्या १० ते १५ दिवसांत सुरू होण्याचे संकेत आहेत. याबाबत कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्व शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.