मनमाड,(प्रतिनिधी)- येथील रेल्वे स्थानकावर मध्यरात्रीच्या दरम्यान एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना भाऊबीजीच्या दिवशीच उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलीस गुन्हा नोंदवीत आहे.
प्राप्त माहिती नुसार मैत्रिणीला फेक आयडी बनवून त्रास दिल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आल्याचं समजतं. युवकाची हत्या करून चार ते पाच जण घटना स्थळावरून पसार झाले आहेत.आरोपींनी रेल्वे स्थानकावर शिवम पवार या तरुणावर चाकूनं वार केले या प्राणघातक हल्ल्यात या युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.