राज्यातील काही भागामध्ये ऐन दिवाळी उत्सवाच्या काळात सरी कोसळणार असल्याचे हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आलं आलं असून राज्यात आगामी दोन दिवसामध्ये ढंगाच्या गडगडाटांसह पाऊस (Rains) होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ देखील देण्यात आली आहे. याबाबत (IMD) ट्विट करून माहिती दिली आहे. गेल्या दोन तीन दिवसांमध्ये कोल्हापूरसह दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.दरम्यान आता अरबी समुद्रात देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे.
लक्षद्विप-द/पु अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र.3 दिवसात वरच्या दिशेने येवुन दाट होण्याची शक्यता.लक्षद्विप-कर्नाटक किनारपट्टीत द्रोणीय स्थिती.यामुळे पुढचे 4-5 दिवस,द कोकण,द मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह व कोल्हापूर सातारा जोरदार पावसाची शक्यता.मुंबई ठाणे 6-7 हलका पाऊस pic.twitter.com/YHcIA4SQ42
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 3, 2021