पाचोरा,(पाचोरा)- शासनाने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2 हजार 800 कोटी ची मदत काल जाहिर केली होती. मात्र या समाविष्ट जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्याचे नाव नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याची भावना मांडत पाचोऱ्याचे कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे आपली भूमिका मांडत शेतकऱ्यांची बाजू सविस्तर पणे मांडली दरम्यान ना.गुलाबराव पाटलांनी आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आक्रमकपणे हा विषय मांडला. त्यावर शासनाने जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत मान्य केल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले आहे.अखेर किशोरआप्पा पाटील यांच्या मागणीला यश आले आहे.
पाचोर भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात जास्तीची मदत देण्याबाबत आमदार कीशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली होती. त्यानंतर एसडीआरएफच्या दरापेक्षा अधिक मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. काल शासनाने मदत जाहीर केली मात्र त्यात जळगाव जिल्ह्याला वगळण्यात आले होते हे सकाळी आमदार किशोर पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ मुंबईत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती.
यावेळी आमदार किशोर पाटील यांचे स्विय सहाय्यक राजेश पाटील,पाचोरा नगरीचे नगराध्यक्ष संजय गोहिल ही होते.
हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचा भूमिका त्यांनी मांडली त्यावर गुलाबराव पाटील यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय आक्रमकपणे मांडला. त्यानंतर शासनाने जळगाव जिल्ह्याचा समावेश करून नव्याने या संदर्भातला निर्णय जाहीर करण्यात येईल असं सांगितले. त्यामुळे या मदतीच्या यादीत जळगाव जिल्ह्याचा ही समावेश होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले . त्यानंतर पालक मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले आज अखेर जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आल्याने आमदार किशोर पाटील यांच्या मागणीला यश मिळाले आहे.