नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम मान्सून माघारीचा परिणाम दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये दिसून येईल. मान्सून इतक्या उशिराने परतण्याची गेल्या ४६ वर्षांतील ही पाचवी वेळ आहे. दक्षिण-पश्चिम मान्सून माघारीच्या वेळी देशाच्या काही भागांमध्ये अजूनही त्याचा प्रभाव दिसून येईल. 30 ऑक्टोबरपर्यंत भारतातील पाच राज्यांमध्ये पाऊस पडेल. यामध्ये तामिळनाडू, केरळ, दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे.
त्यामुळे मुसळधार पाऊस पडणार
बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये २९ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो हे जाणून घ्या. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याचा अंदाज काय?
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) चेन्नईचे संचालक एस बालचंद्रन यांनी सांगितले की, पुढील दोन दिवसांत तामिळनाडूच्या अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. तिरुनेलवेली, तुतीकोरीन, रामनाथपुरम आणि विरुधुनगरमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
मात्र, पुढील दोन दिवस मच्छिमारांसाठी कोणताही विशिष्ट इशारा नसल्याचे त्यांनी सांगितले. ईशान्य मान्सून तामिळनाडूत दाखल झाला आहे तर नैऋत्य मान्सून परतला आहे.
उत्तर भारताच्या तापमानात झपाट्याने घट
त्याचवेळी, आयएमडीने पुढील 6 दिवस दिल्ली आणि आसपासच्या भागात स्वच्छ हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. तथापि, दिल्लीसह उत्तर भारतातील तापमान 1 किंवा 2 नोव्हेंबरपर्यंत 12-13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. मंगळवारी दिल्लीचे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान 16 अंश सेल्सिअस होते.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा चार अंश जास्त आणि किमान १४.६ अंश सेल्सिअस आहे.