मुंबई: आर्यन खान ड्रग प्रकरणात एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर पंच प्रभाकर साईल यांनी गंभीर आरोप केल्यानंतर एनसीबीचे समीर वानखेडे चांगलेच अडचणीत सापडले असतांना आताएनसीबीने चौकशीचे आदेश दिले आहे.एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांची दक्षता समिती समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी नेमण्यात आली आहे. उद्या मुंबईत समीर वानखेडे यांची चौकशी करणारी समिती दाखल होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर समीर वानखेडे दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.
काय आहेत आरोप….
क्रूझ वरिल ड्रग पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान कडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. यापैकी 8 कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे.