खाद्य तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने गृहिनींचे किचन बजेट बिघडले आहे मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्य तेलाच्या वाढ होऊ नये यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून सरकारनं पाम तेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या कच्चा मालाच्या किंमतींमध्ये २०२२ पर्यंत कपात केली आहे.
तसेच कृषी उपकरांमध्ये देखील कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.याचा परिणाम सणासुदीच्या काळात खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यामुळे होतील दर कमी…
केंद्र सरकारने खाद्य तेलावरील सीमाशुल्क कमी केले आहे,कच्च्या पाम तेलावरील मूलभूत आयात शुल्क १० टक्क्यांवरून २.५ टक्के करण्यात आला आहे, तर कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क ७.५ टक्क्यांवरून २.५ टक्के करण्यात आला आहे.