जळगाव,(प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीचे चाळीसगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘भारत बंद’वरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला असून थेट नालायक राज्यकर्ते म्हणून उल्लेख केला आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या व्यवसायांना उभारी द्यायचं सोडून नालायक राज्यकर्तेच वारंवार बंद पुकारताहेत..काय दिल तुम्ही शेतकऱ्याला ना पिकविमा, ना नुकसानभरपाई, न धान्य खरेदी, ना नियमित कर्ज भरणाऱ्याला ५० हजार, उलट लाखो शेतकऱ्यांची वीज कापली, असं ट्विट करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.