मान्सून माघारी जात असल्याने परतीच्या पावसाने राज्यातील काही जिल्ह्यांना झोडपले आहे. असं असतांना पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांना आणखी एका चक्रीवादळाचा धोका असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान येत्या काही दिवसात राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘जवाद’ चक्रिवादळाचा धोका असल्याची माहिती, प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.
परतीच्या पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये या पावसाचा जोर अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. राज्यात काही जिल्ह्यामध्ये १० ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कमी होत जाईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.