मुंबई,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारनं केली होती त्यानुसार आज राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळीपूर्वीच गोड भेट दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारनं राज्य कर्मचाऱ्यांचा तब्बल ११ टक्के महागाई भत्ता वाढवीला असून हा महागाई भत्ता १ जुलै २०२१ पासून मिळणार आहे.