अहमदनगर,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या पाहता १० पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधित रुग्ण संख्या असलेल्या गावांमध्ये कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले असून नगर जिल्ह्यातील जवळपास ६० गावं लॉकडाऊन करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील ११ तालुक्यातील तब्बल ६० गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापणा दि.४ ऑक्टोबर ते दि.१३ ऑक्टोबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन सहाशेच्या जवळपास कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा ५ टक्के पेक्षा जास्त आहे. यामुळे ज्या गावांमध्ये दहा पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधित आहेत अशा गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे.अहमदनगर करिता वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे.