जळगाव,(प्रतिनिधी)- वाघुर धरण क्षेत्रात संततधार पावसाने जलाशयाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे.सद्यस्थितीत वाघूर धरणाचे 8 द्वारे उघडण्यात आली आहे व त्या द्वारे 10060 कयुसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे तरी कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.