रावेर,(प्रतिनिधी)- तालुक्यातील पाल येथे कुटुंबासोबत गेलेल्या मावस भाऊ सुकी नदी पात्रात पाय घसरल्याने त्याला वाचवीण्याच्या प्रयत्नात बहिणीचा तोल जाऊन नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली त्यात या 11 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दि.30 रोजी घडली.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,विवरे येथील अंजूम शे जावेद ( वय ११ वर्ष ) ही तिच्या आई व दोघ भावंडांसोबत पाल येथील मावसा अकबर शे छब्बीर यांच्याकडे दुपारी १२ वाजे दरम्यान गेलेली होती. अंजुम शे. जावेद हि आई, आजी , मामी , भावंडां सोबत पालच्या बाजूला असलेल्या सुकी नदीपात्र ओलांडतांना मावस भावाचा पाय घसरल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न अंजूम शे जावेद या बहिणीने केला असता यात मावसभावाला वाचविण्याच्या प्रयत्नात यशस्वी झालेली अंजूम मात्र नदीच्या प्रवाहात आल्याने तिचा नदीत पाय घसरून पडल्याने पाण्यात वाहून गेल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडल्याने शेख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे.