जळगाव : मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि प्रत्येकाला प्रत्येकी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. याच मागणीवरती प्रतिक्रीया देताना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंवरती निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य, मात्र मागणी करणं सोपं तसेच सर्व निर्णय पंचनाम्यानंतर जिथे परिस्थिती असेल तिथे ओला दुष्काळ जाहीर होणारच आणि राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. गुलाबराव पाटील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.
राजकारण करू नका
केंद्र सरकारने जीएसटीचे GST 50 हजार कोटी दिले नाही, शेतकऱ्यांना काय मदत देणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. केंद्र काही मदत देत नाही असही ते यावेळी म्हणाले आहेत तर कालच देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारवर टीका केली आहे “शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या पोकळ आश्वासनं देवू नका” अशी टीका फडणवीस यांनी राज्य सरकारवरती केली आहे.