जळगाव प्रतिनिधी | माजी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत हे जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी काल रात्री भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेत कृषी कायदे, साखर उद्याेगांकडून शेतकऱ्यांना लाभ याविषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.
महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे या तीनही कृषी कायद्यांचा फायदा शरद पवार यांनी घेतला आहे. करार शेतीच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांत बारामती अॅग्राे कंपनी सर्वाधिक लाभ घेत आहे. स्वत: कायद्यांचा लाभ घ्यायचा मात्र शेतकऱ्यांची वेळ आल्यावर माझ्या कुटुंबाशिवाय कुणालाही लाभ मिळू नये अशी दुटप्पी भूमिका पवार घेत असल्याचा आरोप सदाभाऊ खाेत यांनी केला.
कृषी कायद्यांच्या विराेधात साेमवारी भारत बंद पुकारण्यात अाला हाेता; परंतु या बंदमध्ये शेतकरी कुठेही दिसला नाही. जनतेने या बंदकडे पाठ फिरवली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तीन कायदे तयार करून ७० वर्षांच्या गुलामगिरीतून शेतकऱ्यांना मुक्त करण्याचा अाशावाद निर्माण केल्याचे खाेत म्हणाले. हे कायदे मुक्त बाजारपेठेचे स्वातंत्र्य देत असून, देशात कुठेही मालाची विक्री करता येणार अाहे. या कायद्यांचा गेल्या काही वर्षांत राज्यात सर्वाधिक फायदा घेतला असेल तर ताे शरद पवारांनी घेतला. शरद पवारांनी करार शेतीच्या माध्यमातून अापल्या कंपनीला लाभ मिळवून दिला अाहे. हाच फायदा अाता शेतकऱ्यांना हाेणार असेल तर का मिळायला नकाे, असा सवालही केला. शरद पवारांनी कधीही शेतकऱ्यांची बाजू घेतली नसून, ते जाणता राजा नसून नेताराजा असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी त्यांच्या अात्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे वागत नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना जाेखडातून मुक्त करण्याचे काम अाम्ही करत असून एक देश एक बाजारपेठेसाठी भूमिका घेतल्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.