जळगाव,(प्रतिनिधी) – कालपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहेत. जिल्ह्यातील अनेक मध्यम प्रकल्प तसेच लघु प्रकल्प भरून ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहेत.
जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. धुळे येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) 35 जणांची एक टीम जळगाव मध्ये दाखल झाली आहे. त्यापैकी दहा जणांचे पथक बोटीसह इतर साहित्य घेऊन पाचो-याकडे रवाना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिंह रावळ यांनी दिली आहेत.