नशिराबाद – -नुकताच संपन्न झालेला मेळावा रंग दाखवत असून जळगांव ग्रामीण भागातील नशीराबाद येथील महिलांनी मेळाव्याचे वातावरण बघुन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामजिक न्याय केंद्रीय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांच्या कार्यावर विश्वास ठेवून जिल्हा प्रमुख आनंद बाविस्कर यांचे हात बळकट करणे साठी विविध जाती धर्माच्या महिलांनी कुठल्याच पक्षात रस नसून फक्त रिपब्लिकन पक्षात प्रवेश करत असल्याचे मत व्यक्त केले.
खऱ्या अर्थाने एकच पक्ष निस्वार्थ पने लोकांच्या समस्या सोडवत असल्याचे त्यांनी सांगितले तर कार्यक्रमात नशिराबाद येथील विविध जाती धर्माच्या महिलांचा प्रवेश झाला असून त्यांचा प्रवेश महिला जिल्हा प्रमुख यांनी घेतला.
कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख श्रीमती.नंदाताई बाविस्कर,जिल्हा कार्याध्यक्ष श्रीमती.चारुलता ताई सोनवणे,जिल्हा सरचिटणीस श्रीमती.मिनाक्षीताई पाटिल,जळगांव तालुकाध्यक्ष श्रीमती.रमाताई ढिवरे,महिला महानगर प्रमुख श्रीमती.प्रतिभाताई भालेराव,उपाध्यक्ष श्रीमती.पुनमताई नाथ,महानगर संपर्क प्रमुख श्रीमती.गिताताई वाघ ,कल्पना महाजन ,लता जैन ,पुष्पलता कुलकर्णी रजिया शेख गीता तायड़े अर्चना वाघ सह
जास्तीत जास्त संख्येन महिला मूली उपस्थितीत होते.