चाळीसगाव – गिरणा धरण 90 टक्के भरले असून पाणलोट क्षेत्रात जोरात पाऊस सुरु आहे. त्या मुळे धरणातून केव्हाही पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे, तरी आपल्या कार्यक्षेत्रातील गिरणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा,उप विभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगावचे हेमंत व्ही, पाटील यांनी आवाहन केले आहे.