मुंबई : बंगालच्या उपसगारात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. आता ते आणखी तीव्र झालं आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागानं मुंबईला यलो अलर्ट दिला असून जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईच्या चेंबूर, घाटकोपर आणि सायन परिसरात मुसळधार पाऊस झाला. आयएमडीनं महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असं देखील सांगण्याचत करण्यात आलं आहे.
कोकण पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
हवामान विभागानं सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
14 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?
हवामान विभागानं मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, आणि अमरावती यलो अॅलर्ट दिला आहे.
15 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?
हवामान विभागानं पालघर जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, पुणे जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, गुरुवारी 16 सप्टेंबरला पालघर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.