जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे.हतनूर धरणात ४९ टक्के,गिरणा धरणात ५४ टक्के तर वाघूर धरणात ९४ टक्के उपयुक्त पाणी साठा उपलब्ध झाला असून जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी ८ प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याची सद्यस्थीत पाहायला मिळत आहे.
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात ९४ टक्के इतका पाणीसाठा झाल्याने जळगावकरांचा पाणीप्रश्न पूर्णतः सुटला आहे.
जिल्ह्यातील हे आहेत ‘१३’ मध्यम प्रकल्प
जळगाव जिल्ह्यात गिरणा, वाघूर, हतनूर हे तीन प्रकल्प मोठे असून हिवरा,अभोरा, मंगरुळ, अंजनी, सुकी, मोर, अग्नावती, गूळ, मन्याड,बहुळा, बोरी,तोंडापूर, भोकरबारी असे एकूण १३ मध्यम प्रकल्प आहे.