पुढील ४ ते ५ दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून तसा भारतीय हवामान विभागाने (IMD) सतर्कतेचा इशारा दिला आहे.
येत्या चोवीस तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे हे वारे पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील ‘या’भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता…
मध्य महाराष्ट्र,मराठवाडा विदर्भसह कोकण भागात पुढील चार,पाच दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याच बरोबर सर्व किनारपट्टी असलेल्या जिल्ह्यांसाठी सतर्कत राहावे लागणार आहे.
10Sept,बंगालच्या उपसागरात येत्या २४तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची व त्याची वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता.पुढच्या ४८तासात,अजून तीव्र होण्याची शक्यता.याचा परीणामामुळे राज्यात येत्या 4,5दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.मुसळधार ते अतीमुसळधार काही ठिकाणी
-IMD pic.twitter.com/85Lz4CQsRP— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 10, 2021
या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता….
अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली आणि विदर्भातील अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
Thunderstorm with lightning & light to moderate rainfall very likely to continue at few places over Akola, Yavatmal, Nagpur, Wardha, Bhandara, Gondia, Chandrapur and Gadchiroli and at isolated places over Amravati and Washim districts of Vidarbha. pic.twitter.com/V9dn5ebmNd
— Regional Meteorological Centre, Nagpur (@imdnagpur) September 10, 2021