मुंबई : राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. राज्यात आज ३ हजार ६२६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे असून ५ हजार ९८८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आज राज्यात एकूण ३७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
विशेषत: दैनंदिन मृत्यू देखील बऱ्यापैकी घटले आहेत. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील किंचित वाढ झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.०९ टक्क्यांवर गेला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ७५५ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ४७ हजार ६९५ इतकी आहे.