मुंबई,(प्रतिनिधी)- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थिती मध्ये पुण्यातील जून्नर तालूक्यात शिवसेनेचा मेळावा पार पडला असून या मेळाव्याला झालेल्या गर्दीवरून संजय राऊंतांवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून म्हटलं आहे की,अग्रेलेख हे ज्ञान पाजळण्यासाठी, सल्ले देण्यासाठी, लोकांना मूर्ख बनवण्यासाठी असतात. गर्दीमुळे सर्वसामान्य जनतेला कोरोना होतो. पुण्यातील कार्यक्रमात उसळलेली ही गर्दी कोरोनाप्रूफ आहे बरं… असं म्हणत त्या मेळाव्याचे फोटो देखील शेअर केले आहेत.
दरम्यान संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी मध्ये नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यांचा मुख्यमंत्री असतो, त्यांचेच सरकार असते, हे लक्षात घ्या, कारण सध्या राज्यात ठाकरे सरकार आहे. पण सगळे आपलेच असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.