जळगाव – सध्या प्रत्येक क्षेत्रात तणाव आहे. कौटुंबिक, सामाजिक व कार्यालयीन तणावाचा परिणाम जाणवत आहे. या परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन बाळगत सकारात्मक दृष्टिकोनातून केलेली पत्रकारिता समाजासाठी निश्चित दिशादर्शक ठरेल’ असे मत व्यक्त करत माध्यमांकडून सकारात्मक पत्रकारितेची अपेक्षा जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आज पत्रकारांशी संवाद करतेवेळी व्यक्त केली आहे.
‘प्रत्येक पिढी पत्रकारितेत नवीन बदल घडवत असते. पत्रकारितेतील आव्हाने स्वीकारून सकारात्मक पत्रकारितेची गरज आहे. या कामासाठी दृष्टिकोन सकारात्मक ठेवा’. माध्यमातून सकारात्मक बातम्यांसाठी मोठा स्पेस देणे आज गरज बनली आहे. पत्रकारांची जबाबदारी वाढली आहे,’असे देखील अशोकभाऊ जैन म्हणाले.
पत्रकारांनी व संपादकांनी जे सत्य आहे ते जनतेला म्हणजेच वाचकांना सांगितले पाहिजे.बहुसंख्येने लोक वृत्तपत्र वाचुन मत बनवितात.सकारात्मक दृष्टिकोनातून केलेली पत्रकारिता समाजासाठी निश्चित दिशादर्शक ठरते यांचे आज राज्यात व केंद्रात सत्तेवर असणारे भाजपा प्रणित सरकार आहे. देशातील प्रिंट मीडिया व चॅनल मीडियातील पत्रकारिता करणाऱ्यांनी ज्या पद्धतीने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविले त्यांची आज उजळणी केली पाहिजे. आपल्या हातुन खुप मोठे पाप घडले त्यांचे पायचीत घेण्यासाठी पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता केली पाहिजे. आजचे सत्ताधारी तेव्हाचे विरोधी पक्षनेते होते.त्यांनी काय काय आंदोलने केली होती त्यांची आठवण पत्रकारांनी करून द्यावी