नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. गेला २४ देशात 45 हजार 352 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशात गेल्या २४ तासात 34 हजार 791 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर 366 रुग्णांना प्राण गमवावे लागले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 29 लाख 3 हजार 289 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 20 लाख 63 हजार 616 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 39 हजार 895 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 99 हजार 778 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 67 कोटी 9 लाख 59 हजार 968 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.