नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये खात्यात येत असतात. दर चार महिन्यांनी दोन दोन हजारांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतो. परंतु आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. ही रक्कम दुप्पट होणार आहे. लवकरच याची घोषणा होऊ शकते. केंद्र सरकार आता शेतकऱ्यांना सहा हजार ऐवजी 12 हजार रुपये देण्याचा विचार करत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्लीत भेट घेऊन पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम दुप्पट करण्यासाठी चर्चा केली आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
हप्ते कधी येतात?
3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6,000 रुपये पाठवले जातात. दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता येतो. पीएम किसान पोर्टलनुसार, योजनेचा पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चदरम्यान येतो. दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतो. तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो.
जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्वरित नोंदणी करावी लागेल. अन्यथा ही संधी तुमच्या हातातून गमावली जाईल. या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. ही प्रक्रिया तुम्ही घरी बसून ऑनलाईन पूर्ण करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा पटवारी किंवा स्थानिक सामान्य सेवा केंद्राद्वारे अर्ज करू शकता. तसेच आपण या योजनेसाठी स्वतःची नोंदणी देखील करू शकता.
तुम्ही अशा प्रकारे नोंदणी करू शकता
>> तुम्हाला आधी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
>> आता Farmers Corner वर जा.
>> येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
>> यासह कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि नंतर प्रक्रिया पुढे नेली पाहिजे.
>> या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
>> यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतशी संबंधित माहिती भरावी लागेल.
>> त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.