नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होतानाचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 9 हजारांनी वाढ झाली. २४ दिवसात 46 हजार 164 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ६०७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. गेल्या २४ दिवसात देशात 34 हजार 159 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 25 लाख 58 हजार 530 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 17 लाख 88 हजार 440 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 36 हजार 365 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 33 हजार 725 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 60 कोटी 38 लाख 46 हजार 475 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.