मुंबई : देशात सप्टेंबर महिन्यात साधारण कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे निती आयोगानं वर्तविली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
राज्यातील मंदिरे आणि शाळा कॉलेज सध्या तरी उघडण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊनच मंदिर आणि शाळा कॉलेज उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
तिसऱ्या लाटेसंदर्भात राज्याची तयारी पूर्ण झाली आहे. आरोग्य विभागातील रिक्त जागांची भरती, ऑक्सिजन, मेडिसिन तसेच लहान मुलांच्या आरोग्य संबंधीची तयारी पूर्ण केली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.