मुंबई, (प्रतिनिधी)- मंत्रालयाच्या प्रवेशद्वारा समोर औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुभाष जाधव यांचा आज उपचारा दरम्यान अखेर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली.त्यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरु होते.
सुभाष जाधव यांची जमिन व्यवहारात फसवणूक झाली होती अशी माहिती समोर येत आहे त्यांनी न्याय मिळावा यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. पण तिथे योग्य न्याय न मिळाल्याने ते अस्वस्थ असल्याचे समजते.
सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रहिवासी आहेत. ते दिनांक २० ऑगस्ट, शुक्रवार रोजी मुंबईत मंत्रालय प्रवेशद्वाराजवळ येऊन कीटनाशक पिऊन घेतले होते ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल केलं. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.