रावेर (भागवत महाजन)- रावेर तालुक्यातील मोरगाव येथे वृक्षारोपण संपन्न यशवंत प्रतिष्ठान रावेर व महिला पर्यावरण सखी मंच रावेर संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष जि.प.अध्यक्षा मा.ना.सौ रंजना प्रल्हाद पाटील होत्या प्रमुख पाहुणे नाना शंकर पाटील प्रांत समन्वयक महिला पर्यावरण सखी मंच होते कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या सौ नयना निलेश पाटील प्रधानाचार्य किलबिल अकॅडमी रावेर पूर्व प्राथमिक शाळा व जिल्हा अध्यक्ष महिला पर्यावरण सखी मंच जळगाव या होत्या व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रल्हादभाऊ पाटील उपसरपंच श्री जे आर पाटील,श्री अप्पा पाटील,रवींद्र पाटील,विनोद पाटील सर,पोलीस पाटील विकास केळकर, सबस्टेशन येथील कार्यकारी अभियंते श्री गौरव बाविस्कर खिरवड प्रा. आ.उपकेंद्र येथील सौ ढालवाले सिस्टर,सौ मनीषा पाटील, कार्याध्यक्ष महिला पर्यावरण सखी मंच जळगाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
वक्त्यांनी आपल्या अभिभाषणात काळातील ऑक्सिजनची कमतरता या विषयावर लक्ष केंद्रित करून वाढदिवस अन्य उत्सव हे पर्यावरण पूरक साजरे केले पाहिजे असे आवाहन केले आगामी काळातील गणेश उत्सव हा पर्यावरण पूरक गणेश उत्सव म्हणून साजरा करावा निर्माल्य संकलन करून खतनिर्मिती करण्याचा आग्रह धरला कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात मोरगाव गावात सुरू असलेले पर्यावरण पूरक कार्यक्रम व अभियान खूप छान सुरू आहेत व भविष्यातही माझ्या परीने मी यथाशक्ती आपणास या विषयात सक्रिय मदत करेल असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाना पाटील यांनी विविध गोष्टी रुपी उदाहरण सांगून उपस्थित महिलांना व पुरुषांना लहान मुलांना अगदी छोट्या छोट्या गोष्टीतूनही पर्यावरण संवर्धन कसे करता येईल हे सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरकणी महिला बचत गटाच्या सुनीता ताई महाजन,ललिता पाटील, सरलाताई नरेंद्र पाटील, साधनाताई भिका पाटील, चंद्रकला संजय पाटील,कामिनी पाटील, कार्तिकी महाजन,कुसुम बाई पाटील व गावकरी यांनी योगदान दिले यशवंत प्रतिष्ठान रावेर तर्फे सबस्टेशन येथील कार्यकारी अभियंता श्री गौरव बाविस्कर सर यांना पर्यावरण विषयातील वसुंधरेचे पुत्र हा पुरस्कार देऊन सत्कार व सन्मानित करण्यात आले आ.गौरव बाविस्कर सर व त्यांच्या टीम ने सब स्टेशन परिसरात तीनशे रोपे लावून त्यांची संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे गावातूनच नव्हे तर पंचक्रोशीत ही त्यांचे या कामाबद्दल फार कौतुक होत आहे असे आदर्श अधिकारी सर्व अन्य ठिकाणी लाभो व त्यांच्याकडून अधिकाधिक पर्यावरण विषयाचे कार्य होत राहो
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन वसुधा पर्यावरण सखी मंचच्या शहर अध्यक्षा सौ जयश्री रमेश पाटील यांनी केले.