मुंबई- भांडूप-कांजूरमार्गदरम्यान रेल्वे रुळाला मोठा तडा गेला होता. रेल्वेरुळाशेजारी भाजी उगवून त्यावर उदरनिर्वाह करणार्या एका व्यक्तीच्या हे लक्षात आले आणि त्याने इशारा करत रेल्वे थांबवली. यामुळे मोठा अनर्थ टळला.
गणेश चौहान असं या व्यक्तीचं नाव आहे. रेल्वे रुळालगत भाजी उगवून ती विकून तो आपला उदरनिर्वाह करतो. आज सकाळी त्याने पाहिले की रुळाला मोठा तडा गेला आहे. आज सकाळी हे लक्षात येताच रेल्वेने रुळाच्या दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेतलं. परिणामी ठाण्याच्या दिशेने जाणार्या लोकल खोळंबल्या.