चाळीसगाव,(किशोर शेवरे)- तालुक्यातील वडाळा वडाळी येथे सध्या पिण्यासाठी नळाला येणारे पाणी अतिशय गढूळ,शार युक्त, मातीमिश्रित पाणी पुरवठा होतं असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या पुरवठा होतं असलेले पाणी सदर पिण्यायोग्य नाही,या पाण्याचा मोठ्या प्रमाणात ‘फेस होत असल्याचं आढळून आलं आहे. ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे हे पाणी पिल्याने गावात मोठ्या प्रमाणात पोटाचे विकार,डायरिया ची लागण व इतर साथीच्या आजरांना आमंत्रण देत आहे.आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात होत असलेल्या पाणीपुरवठा पाण्याचे सॅम्पल प्रयोगशाळेत तपासून वरिष्ठांकडे अहवाल सादर करावा अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.