मुंबई,(प्रतिनिधी)- राज्यात अतिवृष्टी सर्वत्र हाहाकार माजला असून काल रात्री रायगड जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडली. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दरड कोसळल्याने तब्बल ३० घरे ढिगाऱ्याखाली दाबले गेले असल्याची माहित मिळत आहे.
याठिकाणी तात्काळ मदत कार्य सुरु झाले असून प्रशासनातर्फे या ढिगाऱ्याखाली ७० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाड तालुक्यात बिरवाडी येथे ढिगाऱ्याखाली तब्बल ३० घरे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या गावातील अनेक लोक बेपत्ता असल्याची शंका स्थानिक पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांनी व्यक्त केले आहे. स्थानिक पोलिस प्रशासन व NDRF टीम येथे दाखल असून बचाव कार्य सुरु आहे.