जळगाव (प्रतिनिधी) दि. 22 – हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने आज रात्री 10 वाजता धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात 1 लाख 6 हजार 122 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहेत.
तरी हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
000000