नवी दिल्ली( वृत्तसंस्था) आगामी राज्यातील सर्व महापालिकाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढण्यासाठी राहुल गांधी यांनी होकार दर्शवीला असून याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलतांना माहिती दिली.
नाना पटोले यांनी आज दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली बैठकीत स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सोबत चर्चा झाली, संघटनात्मक बांधणी बाबत यावेळी चर्चा झाली आल्याचं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्ली येथील निवासस्थानी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी एच के पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बैठक झाली.पुढच्या काळात पक्ष मजबुतीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याबाबतची चर्चा झाली. महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल यासाठी काम करण्याचे आदेश आपल्याला मिळाल्याचे नाना पटोले यांनी सांगितलं.