चाळीसगाव प्रतिनिधी – चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दि ३ जुलै २०२१ रोजी १६० ते १७० क्किंटल तांदूळ भरलेल्या गोण्या व खाली जवळपास ८८ भरलेल्या गोण्या रेशनचा काळ्याबाजारात जात असलेला तांदूळ रात्री १० वाजेच्या सुमारास मार्केट सचिवांच्या ताब्यात पत्रकारांनी दिला होता, गोरगरिबांना मिळणारा तांदूळ काळ्याबाजारात विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने दि ७ रोजी चाळीसगाव तहसिलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दि ३ जुलै २०२१ रोजी ट्रक क्र एम एच १९ झेड ०८६० मध्ये १६० ते १७० क्किंटल तांदूळ भरलेल्या गोण्या व खाली जवळपास ८८ भरलेल्या गोण्या रेशनचा गोरगरिबांना मिळणारा तांदूळ काळ्याबाजारात जात असलेला तांदूळ रात्री १० वाजेच्या सुमारास मार्केट सचिवांच्या ताब्यात पत्रकारांनी दिला होता, तांदुळाचा पंचनामा करण्यात आला व तो तांदूळ रेशनचा असताना देखील त्या व्यापाऱ्यावर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. उलट व्यापाऱ्यांचा बचाव होईल यापद्धतीने कामकाज सुरू आहे. सदर तांदूळ हा शेतकरी व व्यापारी यांच्याकडुन घेतल्याचे सांगितले जात आहे जर शेतकरी तांदूळ पिकवून मार्केट ला देत असेल तर मार्केट कमिटी व महाशय तहसिलदार यांनी संबंधित शेतकरी यांचे जाहीरपणे जवाब घ्यावे महाशय तहसीलदार यांनी चाळीसगाव तालुक्यात रेशनचा काळाबाजार करणाऱ्या दलालांवर कारवाई करावी.
तसेच चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पकडलेला तांदूळ प्रकरणी व्यापाऱ्याचा परवाना निलंबित करून त्याचेवर कारवाई करावी अन्यथा रयत सेनेच्या वतीने तहसील कार्यालय समोर व चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंदोलन केले जाईल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तहसील प्रशासन व चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक जबाबदार राहणार असल्याचा इशारा रयत सेनेच्या वतीने तहसीलदार यांना दि ७ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनाची प्रत
शहर पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चाळीसगाव यांना पाठविण्यात आली आहे. निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,जिल्हाउपाध्यक्ष स्पन्निल गायकवाड,तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार,भरत नवले,दिलीप पवार,किरण पवार अदिच्या सह्या आहेत.