जळगाव /पाचोरा – गेल्या लोकसभा निवडणुकीला देखील मतदारांनी मी लोकसभा निवडणूक लढवावी असा मानस व्यक्त केला होता तो आजही कायम असल्याने जनतेच्या आग्रहास्तव येणारी लोकसभा निवडणुक लढणार असल्याचे आरोग्यदूत डॉ. भूषण मगर यांनी ‘नजरकैद’ शी बोलतांना सांगितलं आहे.
लोकसभा निवडणूकीला अजून तीन वर्षे बाकी असून आरोग्य क्षेत्रात प्रभावी पणे सेवा करणाऱ्या पाचोरा येथील डॉ.भूषण मगर यांच्या संभाव्य उमेदवारीने राजकीय वातावरण रंगले आहे.
डॉ. भूषण मगर यांना येणाऱ्या लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे विचारलं असता ते म्हणाले की, जळगाव लोकसभा मतदार संघातून जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढू, प्रथम जनसेवेला महत्व देण्यात येत आहे. आरोग्य क्षेत्रात तर सेवा अविरत पणे सुरु आहेच त्याच बरोबर फाउंडेशन च्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर दिले जात आहेत.
गेल्या काही दिवसापासून डॉ. भूषण मगर यांच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चेने जोर धरला होता त्यावर त्यांनी आज प्रथमच ‘नजरकैद ‘ शी बोलून लोकसभा निवडणूक लढण्याच्या वृत्ताला प्रथमच शिक्का मोर्तब केला आहे.
सर्व घटकातील मतदारांचा मिळतोय प्रतिसाद
लोकसभा मतदारसंघात भेटी-गाठीच्या माध्यमातून शेतकरी,तरुण, उद्योजक,विद्यार्थी,सामाजिक संस्था-संघटना ,विविध घटकातील जनतेचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
डॉ भूषण मगर हे मूळचे उपखेड ता.चाळीसगाव येथील असून त्यांचे प्राथमिक,व उच्च प्राथमिक शिक्षण पाचोरा येथे झाले आहे.वैद्यकीय ज्ञानाचा फायदा आपल्या पाचोरा शहरात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून देत असून पाचोरा येथे स्थायिक आहेत.
डॉ भूषण मगर हे आरोग्य क्षेत्रातील खऱ्या अर्थाने आरोग्यदूत समजले जातात. कोरोना काळात पाचोऱ्यातील देशमुखवाडी भागातील स्वतःचे विघ्नहर्ता हॉस्पिटल शासनाला समर्पित करून मोफत आरोग्यसेवा दिली. हे हॉस्पिटल महाराष्ट्रातले पाहिले खाजगी कोविड सेंटर होते.त्या सोबतच दोन हजार रुग्णाची मोफत OPD करणारे ते खान्देशाततील पाहिले खरेखुरे आरोग्यदूत होते.आजवर डॉ.भूषण मगर यांनी क्रीडा,आरोग्य,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे म्हणून लोकसभा मतदार संघातील सर्वच स्तरातील मातदारांनी डॉ. भूषण मगर यांनी लोकसभा निवडणूक लढवून खासदरकीच्या माध्यमातून जनसेवा अधिक प्रभावी पणे करावी अशी साकडं घालतांना पाहायला मिळत आहे.
सध्या संपूर्ण लोकसभा मतदार संघात डॉ.भूषण मगर हे मतदारांच्या भेटी- गाठी घेत लोकांच्या अडी-अडचणी समजून घेत शक्य तेवढी मदत करीत आहे .
संपूर्ण जळगाव जिल्हाभर आरोग्यसेवेचा लौकिक,असून साधी राहणी-उच्च विचार,प्रत्येकाशी आपुलकीने वागणे,कोणत्याही क्षणी मदत करण्यासाठी तत्पर असणारा मदतीला धावणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.