जळगाव,(प्रतिनिधी)ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने रविवारी शहरातील प्रमुख आकाशवाणी चौकात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या युवक कार्यकारणी च्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त असे की ओबीसींचे अतिरिक्त नव्हे तर सगळेच राजकीय आरक्षण संपलेले आहे
विकास किसन गवळी वि. महाराष्ट्र सरकार या निकालपत्राचा माध्यमांनी लावलेला अर्थ चुकीचा आहे. यामागे त्यांचे अज्ञान आहे की कटकारस्थान याचा शोध घ्यावा लागेल.
१] हा निकाल फक्त ५ जिल्हा परिषदांनाच लागु आहे काय?
उ- नाही हा निकाल महाराष्ट्रातील सर्व म्हणजे ३६ जिल्हे, [३४ जिल्हा परिषदा] २७ महानगर पालिका, ३६४ नगर परिषदा,नगर पंचायती, नगर पालिका, तालुका पंचायती व २८ हजार ग्रामपंचायतींना लागू आहे. गेले २५ वर्षे मिळणारे महाराष्ट्रातील सर्व राजकीय आरक्षण या निकालाने संपलेले आहे. यापुढे एकाही व्यक्तीला ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळणार नाहीये. या निकालाचा फटका सर्वच्या सर्व म्हणजे सुमारे ५६ हजार ओबीसी प्रतिनिधींना बसणार आहे.
२] हा निकाल संपुर्ण देशाला लागू आहे काय?
उ- होय. या निकालामुळे संपुर्ण देशातील,सर्व ओबीसींचे राजकीय आरक्षण संपलेले आहे. देशातील सुमारे ८ ते ९ लाख ओबीसी लोकप्रतिनिधींचे राजकीय आरक्षण या निकालामुळे संपलेले आहे.
३] सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे राजकीय आरक्षण १०० टक्के कायमचे बंद केले आहे काय?
उ- नाही. या निकालाने ओबीसींना दिलेले [ ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीद्वारे आलेले ] राजकीय आरक्षण घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवलेले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे राजकीय आरक्षण १०० टक्के, कायमचे बंद केलेले नाही. तर त्याची अंलबजावणी ३ अटींची पुर्तता होईपर्यंत संपुर्ण थांबवलेली आहे… वरील सर्व बाबींना लक्षात घेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा आदेशाने व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चे युवक जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार जळगाव शहरातील प्रमुख चौक मानले जाणाऱ्या आकाशवाणी चौकात दिनांक 20 वार रविवार रोजी सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे तरी या आंदोलनात समस्त ओबीसी बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांच्या वतीने करण्यात येत आहे.