रावेर,(प्रतिनिधी भागवत महाजन) – विवरे गावामधे आरोग्य विभागाची टीम पोहचून लोकांन मध्ये डेंगू या सातीची माहिती अशी की येणाऱ्या १५ जुन पासून मानून पाऊस सुरु होत असल्याने तालुक्यातील गावोगावी जाऊन वाढत्या डासोत्पतीचे स्थाने , डांसाची वाढती संख्या , परपंरागत पाणी साठविण्याची सवय व पध्दती , स्वछेताचा अभाव यासह इतरही कारणांमुळे डेंगू चा प्रसार होण्याची मुख्य कारणे आहेत , डेंगू हा डासांन मुळे होणारा रोग आहे याचे प्रमुख कारणे ताप हा संसर्गजन्य आजार आहे.
डेंगू तापाचा प्रसार अस्वछ पाण्याच्या साठ्यामध्ये उत्पती होणाऱ्या डासांन पासुन होतो या पासुन बचाव करण्यासाठी घरातील पाण्याच्या टाक्या , फ्रिज , कुलर मधील साचलेल पाणि वेळो वेळी बदलावेत , आपल्या घराभोवती पाणी साचत असलेल्या टाकाऊ वस्तू , पत्राचे डबे , नारळ्याच्या करवंट्या , रिकामे टायर , अस्वच्छ साचलेले पाणी शवाळे नष्ट करण्याचे आव्हान आरोग्य विभागातर्फ करण्यात आले . डासोत्पती स्थानामध्ये डासाळी भक्षक गप्पी मासे सोडावेत , असे आरोग्य सेवक शुभम महाजन यांनी गावातील नांगरीकांना समजवुन सांगितले . यांची होती उपस्थिती – विवरे बु ग्रामपंचाय सदस्य शेख युसुफ खाटीक ( पत्रकार ) सरदार पिंजारी , मुरलीधर कुंभार , रामु गाढे , शेख आमन शेठ , अभिषेक भालेराव , अनिल राणे , शेख इकबाल लकडेवाला , आनंदा गाढे , इस्माईल खाँ , धान्यव्यापारी- जिवन मोपारी , व गावातील नागरीक उपस्थित होते .