रावेर (भागवत महाजन)- तालुक्यात माझे आस्तित्व असेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांना अडचणीत मध्ये मी बघू शकत नाही शेतकऱ्यांनी खुप प्रेम दिले आहे घरात बसुन चालनार नाही त्यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांच्या भेटीला जाणे हेच माझे कर्तव्य आहे . ज्या मातीत जन्मलो . त्याच देण लागते हा वसा घेऊन
अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे केऱ्हाळे खुर्द अहिरवाडी येथे केळीबागा अनेकांच्या घराची पडझडची व शेती शिवाराची तसेच महावितरणच्या रोहित्र व विद्युत तारांची प्रत्यक्ष पाहणी करतांना माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन सांत्वन केले. तसेच केऱ्हाळा अहिरवाडी परिसरात केळ बागा भुईसपाट झाल्या आहेत यात ३० कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी व महसुल विभागाने वर्तवला आहे मात्र प्रत्यक्षात झालेले नुकसान ५० कोटीच्या घरात आहे शासनाकडे पाठपुरावा करून, लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याबाबत आश्वासन अनिल चौधरी यांनी दिले
लवकरच अनिल चौधरी हे शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे लवकर मिळण्यासाठी विमा कंपनीची भेट घेणार आहे. या वेळे अनिल चौधरी म्हणाले माझ्या शेतकरी बांधवांनो काही अडचण आली तर खचून जाऊ नका, धीर धरा आणि मला संपर्क करा मी तुमचा सेवक तुमच्या साठी सदैव हजर आहे,
या प्रसंगी माजी सरपंच राहुल पाटील, आनंद बाविस्कर, विजय पाटील, पातोंडीचे गणेश बोरसे, विकास पाटील, रमजान तडवी रामभाऊ धनगर, व शेतकरी बांधव उपस्थित होते या दरम्यान अनिल चौधरी यांनी दोन्ही गावाचे आढावा घेतला.