- फौजदारी याचिका मागे घेण्यासाठी विजय पाटील व त्यांच्या गुंडाकडुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची पुण्यप्रताप पाटील यांची तक्रार
- जिल्हापेठ पोलीस स्टेशन चा तक्रार अर्ज घेण्यास नकार
जळगांव :- मे.उच्च न्यायालयात दाखल फौजदारी याचिका मागे घेण्यासाठी विजय भास्कर पाटील व त्यांच्या गावगुंडांकडून धमकी मिळाल्याची तक्रार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुण्यप्रताप पाटील यांनी केली असून याबाबतची तक्रार जिल्हा पेठ पोलीस स्टेशन यांनी घेतली नसल्याचा आरोप देखील श्री.पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वय केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मविप्र कर्मचारी संघटनेच्यावतीने नुतन मराठा महाविदयालयच्या कर्मचा-यांवर विजय भास्कर पाटील व त्यांच्या गुंडाकडून होत असलेल्या अत्याचाराबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला मागील वर्षभरात अनेक तक्रारी दिल्यात परंतु विजय भास्कर पाटील व त्याच्या गुंडांचे जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे असलेल्या कर्मचा-यांसोबत हितसंबंध असल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यांत आलेली नाही. म्हणुन मी या विरोधात मे.उच्च न्यायालयात फौजदारी याचिका क्रं. 720/2019 दाखल केलेली आहे. सदर याचिकेचे दि. 20/08/2019 रोजी कामकाज होऊन या सुनावणीत मे. उच्च न्यायालयाने जिल्हापेठ पोलीस प्रशासनाला मविप्र कर्मचा-यांनी केलेल्या तक्रारीवर केलेल्या कारवाईचा अहवाल श्पथपत्रासह दि. 05/09/2019 रोजी मे.उच्च न्यायालयात दाखल करण्यांचे आदेश दिले. या याचिकेत विजय भास्कर पाटील याच्यावतीने ॲड. चेतन जाधव यांची हस्तक्षेप करण्यांची विनंती केली. परंतु उच्च न्यायालयाने त्यांचा हस्तक्षेप करण्यांस नकार दिला. यामुळे मे. उच्च् न्यायालयाने विजय भास्क्र पाटील व त्याच्या गुंडा विरोधात कठोर पाऊले उचलण्यांस सुरुवात केल्याने व त्यामुळे आपण अडचणीत येणार असे लक्षात आल्याने विजय भास्कर पाटील व त्याच्या गुंडांनी माझे सहकारी श्री.रमेश धुमाळ यांना माझया घरा जवळ गाठुन त्यांना सांगीतले कीं, पुण्यप्रताप याला सदर याचिका मागे घेण्याचा निरोप दे. अन्यथा त्याला आम्ही जिवंत सोडणार नाही. याबाबत मी घडलेल्या सविस्तरपणे लेखी तक्रार अर्ज जिल्हापेठ पोलीस स्टेशनला येथे तक्रार देण्यांस गेलो असता तेथील पोलीस कर्मचारी शिवाजी पवार यांनी पुन्हा एकदा या गुंडाविरोधातील तक्रार अर्ज घेण्यास नकार देऊन मला माघारी पाठविले. तरी याबाबत तिन दिवसांत काही कारवाई न झाल्यास सदर बाब मे.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचे समोर पुन्हा एकदा निदर्शनास आणुन दिली जाईल असे म्हटले आहे. Q