पाचोरा – आमदार किशोर पाटील यांना आपल्या गर्विष्ठ भाषेची उशिरा का असेना उपरती झाल्याने त्यांनी आता माजी मंत्री कै. के. एम. बापू यांच्या नावे बहूळा धरणाचे नाव कृष्णा सागर असे ठेवण्याचे ठरविले आहे असे माजी आमदार दिलीप वाघ यांनी रविवार ता 25 रोजी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले व या संदर्भातील पत्रकही प्रसिद्धीस दिले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या सत्तर वर्षात लोकप्रतिनिधींनी काहीच केले नाही असे विधान आमदार किशोर पाटील यांनी केले होते त्यावरून सर्व माजी आमदारांना विद्यमान आमदारांनी कर्तव्य शून्य म्हणून संबोधले होते त्यांची ही गर्विष्ठ भाषा अंगलट येण्याचे चिन्ह दिसत असल्याने कै. के. एम.बापूंच्या नावे कृष्णा सागर अस्तित्वात आणण्याची उपरती आमदारांना सुचली आहे त्यांच्या कृष्णा सागरच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आमचा त्यास विरोध असण्याचे कारण नाही.
ज्यांनी मतदारसंघाचा आतापर्यंत विकास केला त्यांच्याबाबत आमदारांचे असे बोलणे अत्यंत चुकीचे होते कै. के. एम. बापूंचे कर्तुत्व निर्विवाद आहे कै के एम बापू पाटील व कै. ओंकार वाघ कै. आर. एस. थेपडे यांच्या स्मरणार्थ पिटीसी च्या वतीने आम्ही व्याख्यांन माला अखंडितपणे चालवत आहोत या विभूतींना आम्ही आदरांजली अर्पण करतो गलिच्छ राजकारण करत नाही बहूळा धरणाचे उभारणीचा इतिहास आमदार बदलवु शकत नाहीत त्यात कै ओंकार आप्पांची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहिली आहे पाटबंधारे खात्याचे रेकॉर्ड आमदारांनी तपासून पाहावे धरण स्थळावर कै के एम बापूंचे स्मारक उभारण्याची संकल्पना आनंददायी आहे पण देशभरात कोणत्याही धरणाची ओळख व्यक्तीच्या नावे होत नाही नद्यांच्या नावे धरण ओळखले जाते नद्यांना पवित्र मानून त्यांचे पावित्र्य राखण्याची ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे धरणे व मोठे प्रकल्प उभारणाऱ्यांची नावे कोनशिलेचे च्या माध्यमातून कळत असतात.
केवळ निवडणूक स्टंट म्हणून आमदार भावनिक मुद्दे उपस्थित करत आहेत आतापर्यंत कै के एम बापूंच्या स्मारकाचा विषय आमदारांनी घेतला नाही परंतू दोन महिन्यांवर आलेली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा बुद्धिभेद करण्यासाठी आमदारांचा हा प्रयत्न आहे या मतदारसंघाच्या विकासासाठी कर्तृत्व गाजवणाऱ्या कोणत्याही नेत्याचे कर्तुत्व झाकण्याचा आम्ही कधीच उद्योग केला नाही आम्ही सातत्याने विरोधात राहिलो परंतु कोणत्याही दिवंगत नेत्यांविषयी संभ्रम निर्माण होईल अशी भूमिका मांडली नाही व पुढे ही असे पाप आम्ही करणार नाहीत कर्तुत्ववान विभूतींना मरणोत्तर डावलण्याचा आणि त्यांचा नामोल्लेख टाळण्याचा हलकट विचार परमेश्वराने आमच्या डोक्यात टाकू नये एवढीच आमची अपेक्षा व प्रार्थना आहे असे पत्रकात नमूद केले आहे.