यावल,(दिपक नेवे)- राज्यात कोरोना संसर्गाच्या महामारीने थैमान घातले असुन , यागोंधळामुळे सर्व सामान्या पासुन तर देशाचा अन्नदाता हा मोठया आर्थीक संकटात सापडला असुन, केन्द्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे पुर्ण देश हा आर्थीक संकटाच्या विळख्यात ओढवला गेला असुन , आज दिनांक १७/०५/२०२१ रोजी रासायनिक खतांची वाढ व पेट्रोल डिझेल दर वाढ च्या विरोधात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने यावल तहसील मध्ये निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ऍड देवकांत पाटील , यावल शहर अध्यक्ष हितेंद्र गजरे , कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे ,समन्वयक , किशोर माळी, शहर उपअध्यक्ष वीरेंद्रशिंह सिसोदिया ,सचिव भूषण खैरे, तालुका संघटक भूषण नेमाडे , सद्दाम शेख आदी उपस्थित होते . यावेळी दिलेल्या निवेदनात मागण्या या पुढीलप्रमाणे आहेत .
१) विषय रासायनिक खतांच्या किंमतीत जी दरवाढ झाली आहे ती कमी करावी.
२) देशात झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करण्यात यावी.
यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजपा सरकारचा जाहीर निषेध नोंदवत आहोत.
यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्कत्र शेतकरी बांधवांकडुन पेरणीपूर्व शेतमशागतीच्या कामांना गती देण्यात आली आहे. पेरणीसाठी लागणाऱ्या बी- बियाणे, खतांसाठीच्या आर्थिक बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तयारी केली जात आहे. परंतु केंद्रशासनाकडून रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्यामुळे खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी भाववाढ केली आहे. यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून खतांच्या वाढीव किंमती कमी करण्यात याव्यात व येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे.
तसेच गेल्या वर्षांपासून कोरोना प्रादूर्भाव त्याचप्रमाणे खरीप हंगामात सरासरी पर्जन्यमान होऊन ही उत्पादनात घट आली आहे. शिवाय शेत मालाला योग्य भाव न मिळल्यामुळे शेतकरी बांधवांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. केमिकल व फर्टिलायझरचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे सर्व खत कंपन्याच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे सांगितले होते.
परंतु यंदाचा खरीप हंगाम तोंडावर असतांनाच खत कंपन्यांनी अचानक खतांच्या किंमतीत मोठी दरवाढ केली असून बियाण्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे खते व बियाण्यांच्या विक्रीत, किंमतीत, पुरवठ्यात मोठा काळा बाजार होऊ नये, यासाठी या लिंकिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष पथकाची नेमणूक करावी.
त्याचप्रमाणे देशात झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढ ही सुद्धा कमी करण्यात यावी.
अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .