यावल (दिपक नेवे)- तालुक्यातील थोरगव्हाण येथील राहणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याने आपल्याच शेतात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली असुन, शेतकऱ्याच्या अशा प्रकारे झालेल्या मृत्युमुळे गावात व परिसरातील गावात एकच शोककळा पसरली आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , भानुदास मंगल चौधरी वय३८ वर्ष शेतकरी यांनी दिनांक २ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मनवेल शिवारातील त्यांच्या शे,ताच्या भा बांधावरील झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्मह्त्या केल्याची घटना घडली असुन , या बाबत मयताचे चुलत भाऊ अतुल गोपाळ चौधरी यांनी पोलीसात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत असुन , मयत भानुदास चौधरी यांचे मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी शवविच्छेदन केले असुन , चौधरी यांनी आत्महत्या का केली हे मात्र समजु शकले नाही .