जळगाव, (प्रतिनिधी) – कोरोना संसर्ग वाढत असतांना जळगाव जिल्ह्यासाठी एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संसर्गामुळे बाधित रुग्ण संख्येपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक असल्यानं आता कोरोना बाधित रुग्ण संखेच्या तुलेनेत अधिक रुग्ण बरे होणाच्या राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश झाल्याने जळगाव जिल्ह्यासाठी ही बाब दिलासादायक आहे.
जळगाव जिल्ह्यात बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांपेक्षा दैनंदिन बरे होणारी रुग्णसंख्या अधिक असल्याने राज्यातील १५ जिल्ह्यात जळगाव चा समावेश आहे.
प्रशासनाच्या प्रयत्नांना यश..
BreakTheChain नियमावली लागू झाल्यापासून प्रशासनानं देखील नियम पालन करण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आल्यानंतर नागरिकांनी प्रतिसाद देत नियम पाळतांना दिसून आले. प्रशासनाने कोरोना रुग्णांकारिता उडत असलेल्या तारांबळ नंतर केलेले अचूक नियोजन, वाढीव बेड्स ची उपलब्धता या सर्व नियोजनामुळे प्रशासनाला कोरोनाची परिस्थिती हाताळतांना एकंदरीत यश आले आहे.