ब्रेक द चेन’ अंतर्गत दि. 22 एप्रिल 2021, रात्री 8 वाजेपासून पासून नियमावली लागू करण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू करण्यात येत आहे.आपण खालील लिंकवर अर्ज करू शकता: https://t.co/c2fxPS3Qzv अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करू शकता.
पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थिती केला जावा असं आवाहन महाराष्ट्र पोलीस विभागानं आपल्या ऑफिसियल ट्विटर हॅण्डल वरून ट्विट करून केलं आहे.
दरम्यान राज्य सरकारला खात्री पटली आहे की महाराष्ट्र राज्यामधे कोविड-१९च्या संसर्ग फैलावापासून धोका आहे आणि त्यामुळे हा विषाणूफैलाव रोखण्यासाठी आणि संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी काही आपत्कालीन पावले उचलणे अपरिहार्य झाले आहे. साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील कलम २ आणि आनुषंगिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदी यातून प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून संपूर्ण राज्यभर उपाययोजना लागू केल्या आहेत.त्यात विनाकारण आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.
मात्र आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू करण्यात येत आहे.