कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्यात रिमडेसीवर, ऑक्सिजन, लसीकरण चा तुटवडा भासत असल्यानं या जाणीव पूर्वक तुटवडा केला जातं असल्याचं सांगत या तीनही गोष्टींचं रेशनींग केंद्र सरकाने केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करून केला आहे.
आमदार नाना पटोले यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,रेमडेसीवीर, ऑक्सीजन व लसी नसल्याच्या तक्रारी राज्याच्या सर्वच भागातून येत आहेत. केंद्र सरकारने या तीन्हीचे रेशनिंग केले आहे. या वस्तुंचा पुरवठा करण्यात केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या राज्यांशी जाणीवपूर्वक दुजाभाव करत आहे.
केंद्र सरकार बिगर भाजपा शासित राज्यासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप सातत्याने विरोधक करत असून या मुद्यावरून केंद्र सरकारला लक्ष करतांना दिसत आहे.