- 10 लाख लोकांचे जनजीवन विस्कळीत ; 22 हजारांवर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
तिरुवनंतपुरम- पावसामुळे दक्षिण व पश्चिमेकडील राज्यांचे पावसाने थैमानघातल्याने नागरिक बेहाल झाले आहेत. सर्वाधिक फटका महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू व गाेव्याला बसला असून या राज्यांत पाऊस व पुरामुळे आतापर्यंत ५९ जणांचे प्राण गेले. शेकडाे लाेक बेपत्ता आहेत.
आेडिशा, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत पुराने थैमान घातले आहे. उत्तराखंडच्या चमाेलीमध्ये ढगफुटी झाल्याने एक मुलगा व एका महिलेचा मृत्यू झाला. फालिदा गावांत १० घरे पुरात उद्ध्वस्त झाली. महाराष्ट्र, केरळ व कर्नाटक या तिन्ही राज्यांत पुरामुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली. सुमारे १ लाख घरे पाण्यात बुडाली. दहा लाखांवर लोकांना फटका बसला.
केरळमध्ये मुसळधार पाऊस व भूस्खलनामुळे ९ जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चोवीस तासांत २४ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. वायनाडमध्ये दरड काेसळून अनेक लोक अडकले असून पैकी दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. १०० लोकांना वाचवण्यात आले. सर्व शाळांना सुटी देण्यात आली. आढावा : गृह विभागाने देशातील विविध भागांतील पुराच्या स्थितीचा आढावा घेतला. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशिवाय एनडीआरएफचे महासंचालक, आपत्ती विभाग, हवाई दल व लष्करी अधिकारी हजर होते.
पीडितांना मदतीसाठी राहुल यांचे पीएमना साकडे
वायनाडसह केरळमधील पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना केले. उभय नेत्यांत पुराच्या संकटावर चर्चा झाली. राहुल हे वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. वायनाड भागात माेठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे मतदारसंघाला मदत करण्याची विनंती त्यांनी केली. पंतप्रधानांनी सर्वताेपरी मदत देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती राहुल यांनी दिली आहे.