मुंबई, (प्रतिनिधी)- राज्य सरकारनं राज्यभरात आठवड्यातील दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले असून त्यास आज शुक्रवार ८ वाजेपासून सुरु होतं असून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत राहणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्ग पाहता लॉकडाऊन कडक करीत निर्बंध लागू केले आहेत. तसेच, शनिवार-रविवार या दोन दिवशी वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, हॉटेल्स, रेटॉरन्ट्स, बार बंद करण्यात आले असून त्यांना फक्त सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत पार्सल देण्याची मुभा आहे. दरम्यान, शुक्रवारी ८ वाजेपासून ते सामोवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यात अत्यावश्यक सेवा यांना सूट देण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवा सुरु राहतील…
दूध डेअरी व भाजीपाला देखील नियमांसह सुरु राहील.
केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कारणांसाठी खासगी वाहनांना शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत परवानगी, माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना विकेंड लॉकडाऊनमध्ये परवानगी.
वीकेंड लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु असेल.मीडियाला परवानगी असेल.ई-कॉमर्स सेवा सुरु राहतील
शेतीशी निगडीत सेवा सुरु राहतील. रेस्टोरंट, हॉटेल यांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत होम डिलिव्हरीला परवानगी. १० एप्रिल पासून रेस्टॉरंटमधून डिलीव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक
काय बंद ?
, शुक्रवारी (९ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी (१२ एप्रिल) सकाळी ७ वाजेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासास परवानगी नाही. यात खाजगी वाहनांसह खाजगी बसेसचा देखील समावेश आहे. १० एप्रिलपासून खाजगी वाहतुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी निगेटीव्ह असणं बंधनकारक असेल. ही चाचणी १५ दिवसांसाठी ग्राह्य धरली जाईल. कोरोना चाचणी अहवाल नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड करण्यात येईल.
पार्सल सेवा बंद असून ग्राहकांना हॉटेलला जाऊन पार्सल घेता येणार नाही.(होम डिलिव्हरी मिळेल).सर्व धार्मिक स्थळं बंद, फक्त नित्य पूजा आणि प्रार्थनेला संबंधितांच्या उपस्थितीत परवानगी.