मुंबई, प्रतिनिधी) – महाराष्ट्रात कोरोना चा कहर, हॉस्पिटल मध्ये बेड्स (जागा)नाही, ऑक्सिजन नाही, अशा परिस्थितीत औरंगाबाद येथील घाटी सरकारी हॉस्पटल मध्ये एकाच बेड वर तीन रुग्ण ऑक्सिजन लावून उपचार घेतांनाचे फोटो भाजपाचे किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ट्विट केले आहे.यामुळे आरोग्य सुविधा अपूर्ण पडत असल्याचे उघड झाले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असल्यानं आरोग्य यंत्रनेची तारांबळ उडत असून उपलब्ध आरोग्य सुविधा कमी पडत असल्याने रुग्णांच्या गैरसोयी वाढल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थित काल झालेल्या टाक्स फोर्स च्या बैठकीत ऑक्सिजन पुरवठा, खाटांचे प्रमाण त्वरेने वाढविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.
गेल्या वर्षी आपण टप्प्याटप्प्याने सर्व आरोग्य सुविधा वाढवल्या, फिल्ड रुग्णालये उभारली पण आताच्या या संसर्गात या सुविधा कमी पडतील की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील तसेच ऑक्सिजन उत्पादन ८० टक्के वैद्यकीय व २० टक्के इतर कारणांसाठी राखीव ठेवावे, रुग्णालयांतील खाटांच्या बाबतीत ८०:२० प्रमाणे अंमलबजावणी होते किंवा नाही व रुग्णांची गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
ई आयसीयूचा मोठ्या प्रमाणावर सुलभतेने वापर होऊ शकतो त्यामुळे त्यादृष्टीने देखील आरोग्य विभागाने त्वरित पाऊले उचलावीत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.